Sunday, July 11, 2010

काश्मीर...

काश्मीर... गेल्या ६० वर्षांपासून घोळ चालूच आहे... ४७ चे युद्ध, ६५, ७१ च्या युद्धातील ९५००० पाकिस्तानी सैनिक, कारगिल, आग्रा परिषद, पडद्यामागची चर्चा... असे बरेच प्रकार झाले... निकाल काय तर अजून काश्मीर चे घोंगडे भिजतेच आहे... का ?? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे!! आपले सैन्य / सुरक्षा दल तो सोडवायला कमी पडत आहेत ? का काश्मीर च्या लोकांना शांती नकोच आहे ? का ते नेहमीच इस्लामाबादच्या चिथावणीला बळी पडतात? का दिल्ली ला तो प्रश्नच मुली सोडवायचा नाही? का यात खरच कोण बाहेरच्या शक्तीला फायदा आहे, उदा. अमेरिका?

खूप प्रश्न आहेत, कधी असे वाटते तर कधी तसे... पण अजून तरी उत्तर मिळाले नाही!! का आपल्यालाच उत्तर शोधायची घाई आहे!!

नुकत्याच झालेल्या घडामोडी पाहता आणि श्रीनगर आणि परिसरात दिसलेला भारत राष्ट्राविरुद्ध राग पाहता, अंगावर शहरे आले.. हीच का आपली राष्ट्र उभारणी... म्हणजे नक्की कोण खरे कोण नाही... कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही...

जेवढे माझे वाचन / अभ्यास आहे, तेवढ्या वरून एवढाच अंदाज येतो की हा सारा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे... नव्हे तर कोणाची हिम्मतच होईना काही ठोस निर्णय घेण्याची. ना कॉंग्रेस ची सध्या आहे (तशी ती ६० वर्षात कधीच दिसली नाही), ना भाजप ची होती. राज्यातल्या पक्षांबद्दल बोलाल तर ओमार अब्दुल्ला ची NC यांची भूमिकेत मात्र सलगता आहे. विरोधी पक्ष पीडीपी मात्र कायम आपले रंग बदलताना दिसतो. त्यांना मुळात भारतात राहण्याची इच्छाच दिसत नाही. उलट NC वेळोवेळी राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करताना दिसते.

सध्याच्या घडामोडींचे मूळ कुठेतरी पाकिस्तानात आहे यात बरेच तथ्य आहे. वेळ पण योग्यच निवडली आहे. चिदंबरम पाकिस्तानात, मनमोहन सिंघ कॅनडात आणि श्रीनगर पेटलेले असे एक चित्र जगासमोर उभे करण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला. इस्लामचे नाव दिले की त्या नावाखाली किती लोक मारायचे याला काही मर्यादा नाही. तेच times now ने प्रकाशित केलेल्या telephone conversation वरून स्पष्ट होते. आत यात दिल्ली ने काय करावे??

याला खरच उत्तर नाही. पण थोडी राजकीय इच्छाशक्ती आणि थोडा 'दम' दाखवला तर हे नक्की शक्य आहे... ज्या अर्थी काश्मीरचा एक तरुण IAS साठी होणाऱ्या परीक्षेत भारतात पहिला येतो, ज्या अर्थी काश्मीर मतदानात हिरहिरीने भाग घेतं, सजाद लोने सारखे एकेकाळचे फुटीरवादी पण निवडणुकीत भाग घेतात, त्याअर्थी अजूनही वेळ घेली नाही. काश्मीर शांत झाले की अपोआप काश्मिरी लोक राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील. होत काय तर प्रत्येक वेळेस त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न उभा केला जातो, पण राष्ट्राने त्यांना काय दिले हे पण लक्षात घेतले पाहिजे. नाही का??